
गेल्या 18 वर्षा पासून आमची दिवाळी. पृथ्वी वर चे पहिले अधिवासी, वेल्हा तालुक्यातील आदिवासी कातकऱ्या बरोबरच,अशी ही आगळी वेगळी ज्ञानदायीनी शैक्षणिक व सामाजिक संस्थे ची दिवाळी खऱ्या अर्थाने अशीच साजरी होते. गोर गरीब कष्टकरी कातकऱ्यांच्या व त्यांच्या मुलं बाळांच्या चेहऱ्यावरचा आनंद, हसु, हेच आमच्या संस्थेच्या दिवाळी चा एक एक दिप आहे तो इथुन पुढेही असाच दर दिवाळी ला प्रज्वलीत तेवत राहणार आहे. ज्यांनी ज्यांनी आमच्या या पवित्र कार्यास हातभार लावला त्या सर्वांचे या निमित्ताने खुप खुप आभार व धन्यवाद पुढे ही असेच सहकार्य लाभो ही सदिच्छा.ज्ञानदायीनी गेली 18 वर्षे वेल्हे तालुक्यातील पानशेत, कादंवे, कुरण, ओसाडे, वरदाडे, डोणजे, शिराकोली,मोसे, साईव, वडघर, रुळे,सांडवघर, आंबेड,निगडे,या भागातील आदिवासी कातरी कुटूंबाना दिवाळी फराळाचे वाटप करते व त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करते व त्यांचे जीवनमानं उचवण्याचा प्रयत्न करते आहे, या दिवाळी फराळ वाटपाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष प्रा वंदना मधुकर सरवदे, संस्थे चे सेक्रेटरी प्रा मधुकर म्हंकाळ सरवदे, कार्तिकी सरवदे, संतोष काटकर, विकास काटकर



