प्राचार्य .व्ही. एच. पाटील त्यांनी संस्थेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवत स्वामी रामानंद भारती विद्यालयाच्या विकासाची व गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली ~अविनाश पाटीलल
तासगाव दि 25,(प्रतिनिधी)
प्राचार्य .व्ही. एच. पाटील त्यांनी माझा व संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिराचा कायापालट करून दाखवला व विद्यालयाच्या विकासाची व गुणवत्तेची परंपरा कायम ठेवली असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूरचे व्यवस्थापक मंडळ सदस्य अविनाश पाटील यांनी केले.
ते तासगाव येथे स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर तासगाव येथे प्राचार्य. व्ही. एच. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार समारंभात बोलत होते.यावेळी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे खा.संजय काका पाटील, संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे, सांगली जिल्हा विभाग प्रमुख मिलिंद हुजरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. संजय काका पाटील यांनी संस्थेत दीर्घ काळ ज्ञानदानाचे काम करून सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व शिक्षकांच्या कार्याचा आढावा घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या.
संस्थेचे सीईओ. कौस्तुभ गावडे यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर गुरुदेव कार्यकर्त्यांनी आपल्या संस्थेला व शाखेला विसरू नकाअसे आवाहन केले तर प्राचार्य व्ही. एच. पाटील यांच्यासारख्या अनुभवी व वडीलधाऱ्या व्यक्तीनी सेवानिवृत्तीनंतरही आम्हा तरुणांना संस्था चालवण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करावे असे आवाहन केले. यावेळी प्राचार्य व्ही एच पाटील
पी.बी.बाबर, बी.व्ही.खराटे ,सौ निशा पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला.यावेळी उपमुख्याध्यापक .डॉ.पी.ए. भोसले,पर्यवेक्षक डी.एस
.पाटील, पर्यवेक्षक एस.के.किणीकर, नागराळे चे मुख्याध्यापक डी. टी.जाधव उपस्थित होते.
यावेळी इयत्ता 9 वी तील विद्यार्थीनीं कु.केतकी मोहिते हिने तिचे सेवानिवृत्त प्राचार्य व गुरुदेव कार्यकर्ते यांचे विषयी आलेले अनुभव आपल्या मनोगतातून व्यक्त केले यानंतर सत्कारमूर्ती प्राचार्य व्ही.एच.पाटील म्हणाले कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांची थाप माझ्या पाठीवर होती व संस्थेचे आजी-माजी अजून सेवक, पदाधिकारी सहकारी गुरुदेव कार्यकर्ते विद्यार्थ्यांचीसाथ मिळाली त्यामुळेच मी स्वामी रामानंद भारती विद्यामंदिराचा नावलौकिक कायम ठेवण्यासाठी आवश्यक असणारे काम करत विद्यालयाची गुणवत्ता वाढवू शकलो. उपप्राचार्य परमानंद भोसले यांनी
प्रास्ताविक केले .शेंडगे सर यांनी सूत्रसंचालन केले,डी.एस.पाटील यांनी आभार मानले.