नेर्ले येथील राजकीय समीकर ग्रामपंचायत निवडणूक प्रचार खेळी मेळीत
सविस्तर असे कि,नेर्ले गांव हे राजकीय दृष्ट्या नेहमीच चर्चेत असते. सरपंच पद हे खुल्या प्रवर्गासाठी असल्यामुळे, सरपंच पदासाठी एकूण पाच उमेदवार रिंगणात उतरले असून असून सतीश पाटील (काका ) गट व संजय पाटील (बापू ) गट या दोन गटात चुशीचे वातावरण सुरु आहे. यामध्ये सलग दहा वर्षे सरपंच पदाचा कारभार सांभाळले लालासाहेब पाटील सुद्धा सर्वसामान्य जण माणसांच्या चर्चेत आहेत. सर्वसामान्य आणि गरीबाचा नेता म्हणून लालासाहेब पाटील यांची ख्याती आहे. नेर्ले गावांत मागासवर्गीयांचा खरा विकास केला असेल तर लालासाहेब पाटील यांनीच.तर काही गटाने मागासवर्गीय समाजाच्या जमिनी हडपण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच मागासवर्गीय समाजाचे मताधिक्य जादा असून ही त्यांना सरपंच पदासाठी उमेदवारी दिलेली नव्हती त्यामुळे त्या गटावर नाराजगी आहे.
काही गटातून आपले अस्तित्व कायम राखण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दबाव तंत्र वापरले जात आहे. सदरच्या दबाव तंत्राला जनता जुमानत नसल्याची चर्च्या नागरीकातून होत आहे. राजकीय रणधुमाळीत सरपंच पदाच्या उमेदवारानी आपल्या मागील कामाच्या पोच देत मत मागणी सुरु केली आहे.
परंतु राजकीय समीकरण पूर्ण होण्यासाठी मागासवर्गीयांच्या मताशीय पूर्णच होत नाही अशी सध्या परस्थिती आहे. तर काही गटाकडून चक्क विविध ठिकाणी कामाला असणाऱ्या कामगाराकडूनच दबाव तंत्राचा वापर केलेला दिसून येत आहे. तसे पाहायला गेले तर गावांतील विकास कामे ठिकठिकाणी चांगल्या प्रतीचे झाले असून मागासवर्गीय सम्शान भूमीकडे जाणारा रस्ता अजून कोणत्याच गटाकडून चांगल्या प्रतीचा केला गेला नाही आज ही सदरच्या रस्त्यावर पाणी साचलेले आहे. त्यामुळे वेगवेगळ्या वार्डातून किती जरी जोमाने उमेदवार मताधिक्य घेत असेल तर तो मागासवर्गीयांच्या वार्डात आला कि त्याला मतांसाठी अटापिटा करावा लागत आहे.