जीवनामध्ये सेवाधर्म पाळल्यास सुख समाधान मिळते प्राचार्य डॉ अशोक ढगे
नेवासा तालुक्यामध्ये नेवासा खडका रोडवर तालुक्यातील एकमेव शरणपूर वृद्धाश्रम आहे या ठिकाणी दिगंबर गोंधळी यांनी वडिल गणपतराव गोंधळी यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्ताने मिस्ट अन्नभोजन कार्यक्रमाचे नियोजन केले होते
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ अशोकराव ढगे होते व व्यासपीठावर उपस्थित प्रा डॉ किशोर धनवटे ह भ प भागचंद महाराज पाठक सचिन हुसळे तसेच पांडुरंग रोडगे वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर गोंधळी बंधू व अभ्यासू पत्रकार सुधीर चव्हाण उपस्थित होते
याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉ अशोकराव ढगे म्हणाले की जीवनामध्ये सेवा धर्म पाळावा प्रत्येकाने शैक्षणिक सेवा कृषी सेवा शेतीची सेवा औद्योगिक सेवा सामाजिक सेवा व सर्वोत्कृष्ट धार्मिक सेवा केल्यामुळे आपणाला सुख व समाधान तसेच आनंद मिळतो वृद्धाश्रमातील आजी-आजोबांचे मनोबल वाढविण्यासाठी व त्यांच्या बरोबर आनंद घेण्यासाठी मानव सेवा करणे काळाची गरज आहे माणूस सेवेला धार्मिक अधिष्ठान असेल तर विचाराची व कार्यक्रमाची उंची वाढते असे प्रतिपादन डॉक्टर ढगे यांनी केले
ह भ प भागचंद महाराज यांनी चांगले विचार व संस्कारीत संगत असेल तर जीवनामध्ये परमेश्वर आपल्या पाठीशी कृतीसाठी हमखास उभा राहतो
प्राचार्य डॉ किशोर धनवटे यांनी ज्ञानेश्वरीच्या ओवीचा संदर्भ देऊन आपण आपले कर्म विधायक करीत असल्यास जीवनामध्ये यश हमखास मिळते असे प्रतिपादन केले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभ्यासू पत्रकार सुधीर चव्हाण यांनी उद्दिष्ट विशद करताना समाजामध्ये खेडले काजळी सारख्या गावात सरपंच सौ निर्मला ताई ढगे यांनी आदर्श निर्माण केले
याप्रसंगी शब्दगंध साहित्यिक परिषदेचे कार्याध्यक्ष सचिन हुसळे यांनी कविता सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर यांनी आपण सर्वजण प्रेमाने आलात व आमचा उत्साह वाढला याबद्दल ऋणनिर्देश सर्वांचे व्यक्त केले