ताज्या घडामोडी

डॉ.बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रभर पोहचवली

Spread the love

डॉ.बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रभर पोहचवली त्यामुळेच राज्यातील असंख्य कुटुंबे शिक्षित झाली. कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन
कुंभोज येथे प्राचार्य एम. ए. पिरजादे यांचा सेवा गौरव समारंभ संपन्न
कुंभोज दि.15(प्रतिनिधी)

डॉ.बापूजी साळुंखे यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या खेड्यापाड्यातून उभ्या केलेल्या शाखा मुळेच शिक्षणाची ज्ञानगंगा महाराष्ट्रभर पसरली व खऱ्या अर्थाने राज्यातील असंख्य कुटुंबे शिक्षित झाली व स्वतःच्या पायावर उभी राहिली असे प्रतिपादन संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी केले.
ते न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज
कुंभोज चे प्राचार्य एम. ए. पिरजादे यांच्या सेवा गौरव समारंभात बोलत होते. यावेळी कोल्हापूर जिल्हाविभाग प्रमुख श्री राम साळुंखे, संस्थेचे आजीव सदस्य बी. एस. कुंभार, अशोक माळी उपस्थित होते यावेळी बोलतान बी एस कुंभार यांनी शिक्षण प्रवाहामध्ये एम ए. पिरजादे यांच्यासारखी माणसे आवश्यक आहे ते नेहमी विद्यार्थ्यांचा व शाखेचा विचार करणारे प्राचार्य होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना विद्यालयाचे प्राचार्य पिरजादे यांनी विद्यालयाच्या प्रगतीसाठी कुंभोज गावातील नागरिकांनी नेहमीच मदतीचा हात पुढे केला व वेळोवेळी सहकार्य केले त्यामुळेच अल्पावधीतच विद्यालयाची प्रगती करता आली. यावेळी आजी माजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक विविध शाळांचे मुख्याध्यापक, प्राचार्य तसेच शिक्षक उपस्थित होते सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सौ. एस. व्ही.पाटील यांनी सूत्रसंचलन केले
शितल कांबळे यांनी आभार मांनले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!