ताज्या घडामोडी
राज्यात विविध ठिकाणी जळगाव, अमळनेर अनेक जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसासह गारपीट चे पंचनामे ताबडतोब सादर करण्याचे नामदार अनिल पाटील यांचे आदेश
ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील मागील आठवडाभर अमळनेर तालुका तसेच जळगाव जिल्ह्यासह राज्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपीट व पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा बंद झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकाची नासाडी झाली असून काही गुरे दगावली आहेत.या आपत्तीची तात्काळ दखल घेत महसूल, कृषी व विद्युत मंडळाला लवकरात लवकर पंचनामे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अस्मानी संकटात राज्यसरकार व मदत व पुनर्वसन विभाग शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून लवकरात लवकर नुकसानभरपाई दिली जाईल.