ताज्या घडामोडी

गीतकार भारत कवितके यांची ” गीतकार कला रत्न पुरस्कार” करीता निवड.

Spread the love

मुंबई कांदिवली.
मुंबई कांदिवली येथील पत्रकार साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते व गीतकार भारत कवितके यांची राज्यस्तरीय गीतकार कला रत्न पुरस्कार करीता निवड झाल्याचे तेजस फाऊंडेशन नाशिक या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चित्रपट व नाट्य अभिनेत्री मेघा डोळस व संस्थेच्या निवड समितीने भारत कवितके यांना निवड पत्रा व्दारे कळविले आहे.गीतकार भारत कवितके यांचे ” राणी सांजवेळी..” हे युट्यूबवर आलेल्या गाण्याने सध्या प्रसार माध्यमांवर प्रचंड धुमाकूळ घालताना दिसून येते.पी.पी.म्यझिक समुह व्दारा निर्माता श्रीराम घडे गीतकार भारत कवितके, गायक व संगीतकार सागर खरात आणि विशेष सहकार्य लाभलेले कवी गायक दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी यांच्या सहकार्याने तयार झालेले हे गाणे अगदी थोड्याच अवधीत खूपच लोकप्रिय झाले, यामुळेच संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चित्रपट व नाट्य अभिनेत्री मेघा डोळस व त्यांच्या निवड समितीने भारत कवितके यांची राज्यस्तरीय गीतकार कला रत्न पुरस्कार करीता निवड केली आहे.26 जून 2024 रोजी दुपारी 1 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या वेळात मौलाना आझाद संशोधन केंद्र,टि.व्ही.सेंटर, हडको, छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते भारत कवितके यांना सदर पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.यावेळी भारत कवितके यांनी प्रतिक्रिया दिली की,” गीत लेखन मधील माझा हा पहिलाच प्रयत्न होता आणि या राणी सांजवेळी…. गाण्याला रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला, मला यांचा खूप आनंद वाटतो.ओळखीच्यानी, अनोळखीच्यानी मोबाईल वरून गाणे आवडले असल्याचे कळविले.या गाण्याच्या गीतकारास जरी हा पुरस्कार जाहीर झाला असला तरी मी निर्माता श्रीराम घडे संगीतकार गायक सागर खरात आणि विशेष सहकार्य लाभलेले कवी गायक दिग्दर्शक प्रमोद सूर्यवंशी या सर्वांना श्रेय जाते.असे मी मानतो “.गीतकार भारत कवितके यांना सदर पुरस्कार जाहीर झाला तेव्हा पासून समाजातील विविध विभागातून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!