ताज्या घडामोडी

धारावीत भटक्या कुत्र्यांची दहशत ! नागरिक भयभीत

Spread the love

मुंबई- धारावीतील काळा किल्ला परिसरातील गोल्ड फिल्ड भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या कुत्र्यांच्या कळपाची दहशत निर्माण झाली.दुचाकीस्वार आणि लहान मुलांवर ही भटकी कुत्री अचानक हल्ला करत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.गोल्ड फिल्ड भागात हा भटक्या कुत्र्यांचा कळप फिरत असून आतापर्यंत अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.प्रामुख्याने ही कुत्री संथ गतीने चाललेल्या दुचाकीस्वाराचा पाठलाग करताना दिसत आहेत.तसेच रस्त्यावरून चालणार्‍या लहान शाळकरी मुलांवर ही कुत्री हल्ला करू लागली आहेत.स्थानिक नागरिकांनी याबाबत पालिकेच्या संबंधित विभागाकडे अनेकदा तक्रारी केल्या आहेत.मात्र अद्याप त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप हे स्थानिक नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!