शेतकरी संरक्षण कायदा काळाची व निकडीची गरज डॉ अशोकराव ढगे
आपल्या देशामध्ये शेतकरी वाचविण्यासाठी अधिकृत शेतकरी संरक्षण कायदा आला पाहिजे त्यासाठी भारतीय जनसंसद यांच्यामार्फत शेतकरी संरक्षण कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी कृषी वैज्ञानिक व कायदे तज्ञ डॉक्टर मुकुंदराव गायकवाड तसेच भारतीय जनसंसद राज्य अध्यक्ष अशोकराव सब्बन आणि कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी विचार मंथन केले आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना केरकचरा समजले जाऊ लागले आहे त्यामुळे दररोज आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत आहे भारत देश स्वतंत्र झाला तेव्हाच शेतकऱ्यांना सुरक्षा व संरक्षण देण्यासाठी कायदा करणे गरजेचे होते तथापिर दुर्दैवाने तसेच झाले नाही ग्राहक संरक्षण कायदा व पत्रकार संरक्षण कायदा तसेच डॉक्टरांना संरक्षण कायदा केला गेला आहे परंतु बहुजन 63% शेतकरी या संरक्षण कायद्यापासून वंचित राहिले आहेत आणि दुर्दैवाने देशातील शेती व्यवसाय वाचवा वाचवा असा टाहो फोडण्याची वेळ आली आहे त्यासाठी घटनेमध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना विशेष मूलभूत हक्क दिले गेले पाहिजेत आणि त्यासाठीची वैचारिक तात्विक मार्गदर्शन तत्वे ठरविणे काळाची गरज आहे अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉक्टर अशोकराव ढगे यांनी दिली शेती संरक्षण कायदा तयार करण्यासाठी व त्याचा मसुदा उत्तम कायदा व्हावा यासाठी भारतीय जनसंसद व्यासपीठावरून कृती करण्यात येणार आहे तरी शेतकरी बांधवांनी या विषयाकडे गांभीर्याने पाहावे व सक्रिय सहयोग द्यावा असे आवाहन राज्य अध्यक्ष अशोकराव सब्बन यांनी केले.