कौस्तुभ गावडे हेच डॉ.बापूजी साळुंखे यांच्या विचाराचे खरे वारसदार आहेत. माजी आ.भगवानराव साळुंखे यांचे प्रतिपादन
नागराळे येथे मुख्याध्यापक डी.टी जाधव यांचा सेवागौरव सत्कार समारंभ संपन्न
इस्लामपूर दि 13 (वार्ताहर )
विवेकानंद शिक्षण संस्थेचे सीईओ कौस्तुभ गावडे यांनी बापूजीं साळुंखे यांची विचारधारा स्विकारून संस्थेचा कार्यविस्तार व बदलत्या शिक्षण प्रवाहा बरोबर सर्व गुरुदेव कार्यकर्त्यांना घेवून जाण्याचा सुरू केलेला प्रयत्न यामुळे तेच खरे बापूजींच्या विचाराचे वारसदार आहेत असे प्रतिपादन माजी शिक्षक आ. भगवानराव साळुंखे यांनी केले.
ते नागराळे तालुका पलूस येथे पै.विष्णू नागराळे विद्यामंदिर चे मुख्याध्यापक डी.टी जाधव यांचा सेवागौरव सत्कार समारंभात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात विवेकानंद शिक्षण संस्था ही डॉ. बापूजी सांळुखे यांच्या विचारधारेवर चालणारी आहे. यांचे तत्वज्ञान प्रत्येकाने स्विकारले पाहीजे असे सांगितले.मुख्याध्यापक डी . टी जाधव यांनी बापूजीची तत्वे स्विकारून ज्ञानदानाचे कार्य केले व नागराळे शाखा विकासासाठी मोठे योगदान दिले आहे.असे सांगितले
.यावेळी डी. टी. जाधव यांचा सपत्नीक सत्कार कौस्तुभ गावडे यांनी केला. सत्कारमूर्ती डी. टी. जाधव यांनी आपल्या भाषणात सर्व सेवाकाळात विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून प्रामाणिकपणे ज्ञानदान केले. नागराळे शाखेच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न केले असे सांगितले. कार्यक्रमासाठी व्ही .वाय पाटील, संस्थेचे सांगली विभागप्रमुख प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे , माजी उपसभापती विश्वास पाटील, माजी सहसचिव पी. एस. चव्हाण , आजीव सदस्य अशोक पवार, जी. आर. पवार. आर. डी. पाटील, संपर्क प्रमुख व्ही. एच.
पाटील ,सी.व्ही.पाटील , सुनील पाटील,नागराळे गावच्या सरपंच श्रीमती शांताताई दिंडे, उपसरपंच अपर्णा मस्के, सौ. वनिताताई पाटील , इंद्रजित पवार, शशिकांत पाटील, गुत्ता आण्णा, परिसरातील विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक , शिक्षक ,ग्रामस्थ ,नातेवाईक उपस्थित होते.महेश धेंडे यांनी प्रास्ताविक केले. इंद्रजित पवार यांनी आभार मानले