जाकादेवी प्रशालेतील दहावी -बारावी विद्यार्थ्यांचा शुभचिंतन कार्यक्रम उत्साहात
जाकादेवी/वार्ताहर
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड एज्युकेशन सोसायटीच्या तात्यासाहेब मुळ्ये माध्यमिक विद्यालय व बाबाराम पर्शराम कदम कनिष्ठ महाविद्यालय जाकादेवी येथे इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षासाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभचिंतन समारंभ मालगुंड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुनिल उर्फ बंधू मयेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विवेक परकर, कोषाध्यक्ष संदीप कदम, सचिव विनायक राऊत, सहसचिव श्रीकांत मेहेंदळे,शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे सी.ई.ओ. व संचालक किशोर पाटील ,संचालक रोहित मयेकर, संचालक परेश हळदणकर, सल्लागार नंदकुमार साळवी, नंदकुमार यादव ,रजत पवार, प्राचार्या स्नेहा पालये,हनुमंत कदम,निमंत्रित संचालक प्रतिक देसाई ,ओरी गावचे उपसरपंच संकेत देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक बिपीन परकर, पर्यवेक्षक शाम महाकाळ, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख संतोष पवार, यांसह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, हितचिंतक उपस्थित होते. इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी शाळेला प्रेमाची भेटवस्तू प्रदान केली. यावेळी निवडक विद्यार्थ्यांनी शाळा व संस्थेविषयी आपल्या भावना व कृतज्ञता व्यक्त केली .शिक्षण संस्थेची पदाधिकारी, मुख्याध्यापक,शिक्षक, हितचिंतक तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष बंधू मयेकर यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देताना भविष्यात सुजाण नागरिक तयार होण्याची दृष्टीने आई-वडिलांचा कायम आदर मनी ठेवून उच्च शिक्षणाची कास धरून आपले उद्दिष्ट पूर्ण करा आणि जीवन हे समृद्ध बनवा असे आवाहन केले. शुभेच्छा कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वी कार्यवाही विद्यार्थ्यांनी केली होती.