ताज्या घडामोडी

एखादा जीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का?? – डॉ.अभिजीत जाधव

Spread the love

पन्हाळा तालुक्याती कोडोली येथील नरसोबाच्या ओढ्यावरील धोकादायक नागमोडी वळणावरील अपघातामधे एखादा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?? असा परखड सवाल रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाला विचारलेला आहे.

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे नरसोबाच्या ओढ्यावरील धोकादायक नागमोडी वळणावरती असणाऱ्या पुलाचा कठडा तुटलेला आहे. तसेच तेथे रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरच्या वतीने बसवण्यात आलेले बॅरिकेट्स दिशादर्शक फलक हे नवीन रस्ता करत असताना काढून टाकलेले आहेत.त्यामुळे या ठिकाणी वाहन चालवणाऱ्या नवीन वाहनचालकाला या वळणाचा अंदाज येत नसल्याकारणाने या ठिकाणी ओढ्यामध्ये चार चाकी वाहन अपघातग्रस्त होत असून या ठिकाणी जीवित हानी होण्याची शक्यता आहे.
रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरच्या वतीने वेळोवेळी मागणी करून सुद्धा या ठिकाणी फक्त एक वेळेसच दिशादर्शक फरक आणि बॅरिकेट्स बसवलेले आहेत तरी इथून पुढची जीवित हानी टाळण्यासाठी संबंधित विभागाने प्रशासनाने यावर धोकादायक वळणावरती बॅरिकेट्स दिशादर्शक फलक रेडियम तसेच रस्त्यावरती रिफ्लेक्टर्स बसवण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूरचे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!