ताज्या घडामोडी

अवकाळी पावसाने झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे. माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे…

Spread the love

शुक्रवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे नेवासा तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे प्रमाण कुकाणा व चांदा मंडलामध्ये सर्वाधिक आहे या नुकसानीचे तातडीने पंचनामे सुरू करण्यासाठी आज तालुक्याचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी तहसीलदार नेवासा यांची भेट घेऊन त्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाच्या आलेली पीक गहू कांदा मका केळी डाळिंब यांचे खूप मोठया प्रमाणात झाले आहे. अगोदरच पंधरा दिवसांपूर्वी तालुक्यात झालेल्या वादळामुळे प्रचंड नुकसान झालेले तालुक्यातील आठ मंडलापैकी फक्त तीनच मंडलाला यावेळेस नुकसान भरपाई मिळालेली आहे उर्वरित पाच मंडळ हे नुकसान भरपाई पासून वंचित राहिले आहे मागील पंधरवड्यात झालेल्या वादळात व पावसामुळे नुकसान झालेल्या परंतु भरपाई न मिळालेल्या त्या पाच मंडळाला देखील नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी माजी आमदार मुरकुटे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केले आहे कालच्या झालेल्या पावसामुळे त्वरित पंचनामे करून या नुकसानीची तातडीने भरपाई मिळावी यासाठी लवकरच जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्याची मागणी करणार आहे यावेळी आमदार मुरकुटे यांनी तहसीलदारांना तसेच जनावरांचे गोठे घरे जनावरे जे काही नुकसान झाल्यास त्याचेही पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी दिले आहे तसेच शेतकऱ्यांनी आपल्या गावातील कृषी अधिकारी ग्रामसेवक व तलाठी यांची भेट घेऊन पंचनामे करून घेण्याचे आव्हान शेतकऱ्यांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!